जवाहरलाल नेहरू
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पंडित जवाहरलाल नेहरू | |
१ ले भारतीय पंतप्रधान
|
|
कार्यकाळ ऑगस्ट १५, १९४७ – मे २७, १९६४ |
|
राष्ट्रपती | राजेंद्र प्रसाद व सर्वपल्ली राधाकृष्णन |
---|---|
मागील | पद स्थापित |
पुढील | गुलजारी लाल नंदा |
|
|
कार्यकाळ ऑगस्ट १५, १९४७ – मे २७, १९६४ |
|
मागील | पद स्थापित |
पुढील | गुलजारी लाल नंदा |
|
|
कार्यकाळ ऑक्टोबर ८, १९५८ – नोव्हेंबर १७, १९५९ |
|
मागील | टी.टी. कृष्णमचारी |
पुढील | मोरारजी देसाई |
|
|
जन्म | नोव्हेंबर १४, १८८९ अलाहाबाद, उत्तर प्रदेश, भारत |
मृत्यु | मे २७, १९६४ नवी दिल्ली, भारत |
राजकीय पार्टी | अखिल भारतीय काँग्रेस पक्ष |
पत्नी | कमला नेहरू |
आपत्ये | इंदिरा गांधी |
व्यवसाय | बॅरिस्टर |
भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते.
[संपादन] संक्षिप्त चरित्र
[संपादन] वैयक्तिक आयुष्य
नोव्हेंबर १४, १८८९ रोजी कॉँग्रेसचे नेते श्री मोतीलाल नेहरू यांचे येथे अलाहाबाद येथे जन्म. फेब्रुवारी ७, १९१६ रोजी वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा विवाह कमला कौल यांच्याशी करण्यात आला. इ.स. १९१७ साली त्यांना इंदिरा प्रियदर्शीनी हे कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांचे पिता मोतीलाल नेहरू यांचे फेब्रुवारी ६, १९३१ रोजी व पत्नी श्रीमती कमला नेहरू यांचे फेब्रुवारी २८, १९३६ रोजी निधन झाले.
[संपादन] राजकीय आयुष्य
पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे झाला. त्यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिकवणीद्वारे घेतले. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे ते हॅरो येथे शिक्षणाकरीता गेले. कॅम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान (नॅचरल सायन्स) या विषयात पदवी घेतली. ते १९१२ साली भारतात परतले आणि सरळ राजकारणात उतरले. विज्ञार्थी दशेत असताना सुद्धा त्यांना पारतंत्र्यातील विविध देशांच्या स्वातंत्र्यसंग्रामात रूची होती. आयर्लंड मधील सिन फेन मुव्हमेंट मध्ये त्यांनी विशेष रस घेतला. त्यामुळे भारतात परतल्यावर ते आपसुकच स्वातंत्र्य चळवळीत खेचले गेले.
१९१२ मध्ये झालेल्या बंकीपूर कॉंग्रेस अधिवेशनाला ते उपस्थित होते. १९१९ मध्ये ते होमरुल चळवळीचे अलाहाबादचे अध्यक्ष बनले. १९१६ मध्ये ते प्रथमच महात्मा गांधींना भेटले आणि त्यांच्यापासून विलक्षण प्रेरीत झाले. १९२० साली त्यांनी उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला. १९२०-२२ दरम्यान असहकार आंदोलनामुळे त्यांना दोनदा कारावास भोगावा लागला.
सप्टेंबर १९२३ मध्ये पं. नेहरू अखिल भारतीय कॉंग्रेस परिषदेचे सचिव बनले. १९२६ मध्ये त्यांनी इटली, स्वित्झर्लंड, इंग्लंड, बेल्जियम, जर्मनी आणि रशिया आदी देशांचा दौरा केला. १९२८ मध्ये सायमन कमिशन विरोधात निदर्शने करताना त्यांना लाठीहल्ल्याला सामोरे जावे लागले. त्याच वर्षी झालेल्या सर्वपक्षीय कॉंग्रेस सभेला ते उपस्थित होते. १९२८ मध्येच त्यांनी स्वतंत्र भारत चळवळ सुरु केली. १९२९ साली पं. नेहरू भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले. तेथे संपूर्ण स्वातंत्र्य गेच ध्येय्य निश्चित केले गेले. १९३० ते १९३५ दरम्यान मीठाचा आणि अन्य सत्याग्रहांमुळे त्यांना अनेकदा कारावास भोगावा लागला. १४ फेब्रुवारी, १९३५ रोजी त्यांनी अल्मोरा जेलमध्ये आपले आत्मचरित्र पूर्ण केले. सुटकेनंतर ते स्वित्झर्लंड, इंग्लड, स्पेन आणि चीन येथे जाऊन आले. ७ ऑगस्ट १९४२ रोजी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात त्यांनी भारत छोडो ही क्रांतीकारी घोषणा केली. पुढच्याच दिवशी त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि त्यांना अहमदनगर किल्ल्यात नेण्यात आले. ही त्यांची कैद ही सर्वांत दीर्घकाळी पण शेवटची ठरली. एकंदर पं. नेहरूंनी ९ वेळा कारावास भोगला. १९४५ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. १९४६ मध्ये ते दक्षिण पूर्व आशियाला जाऊन आले. त्यानंतर ६ जुलै, १९४६ रोजी त्यांना कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. १९५४ पर्यंत त्यांनी पदभार सांभाळला.
मागील प्रथम |
भारतीय पंतप्रधान ऑगस्ट १५, १९४७ - मे २७, १९६४ |
पुढील गुलजारी लाल नंदा |
मागील प्रथम |
भारतीय परराष्ट्रमंत्री ऑगस्ट १५, १९४७ - मे २७, १९६४ |
पुढील गुलजारी लाल नंदा |
मागील टी.टी. कृष्णमचारी |
भारतीय अर्थमंत्री ऑक्टोबर ८, १९५८ - नोव्हेंबर १७, १९५९ |
पुढील मोरारजी देसाई |
|
---|
नेहरू · नंदा · शास्त्री · इंदिरा गांधी · देसाई · चरण सिंग · राजीव गांधी · व्ही.पी. सिंग · चंद्रशेखर · राव · वाजपेयी · देवेगौडा · गुजराल · मनमोहनसिंग |