राळेगण सिद्धी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
राळेगण सिद्धी हे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तलुक्यातील गाव आहे. ग्रामस्थांच्या सहकार चळवळीद्वारे राळेगण सिद्धी या गावाचा कायापालट घडला आहे. स्वच्छता, पाणी व्यस्थापन व सामाजिक सलोखा यावर महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठसमाजसेवक, अण्णा हजारे यांनी भर दिला होता व हा बदल घडवून आणला. या कामाबद्दल गावाला अनेक पारितोषिके मिळाली आहेत.
आजही देशभरातून या गावाची भरभराट कशी झाली हे जाणून घेण्यासाठी लोकांची रीघ लागलेली असते.