भारतीय प्रजासत्ताक दिन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जानेवारी २६, इ.स. १९५० या साली भारतीय राज्यघटना(संविधान) अस्तित्वात आली. हा दिवस भारतात प्रजासत्ताक दिन म्हणुन साजरा केला जातो. या दिवशी भारताची राजधानी, नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते.
भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेनाविभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी)समवेत संचलन करतात. भारतीय राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात.
या संचलना बरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलकही प्रस्तुत केली जाते.
या सारखेच संचलन भारतातील सर्व राज्यात आयोजीत केले जाते. प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात.